Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुम्ही जागृत अवस्थेतून झोपेकडे जाणीवपूर्वक जाऊ शकलात, तर तुम्ही जीवनातून मृत्यूकडेही जाणीवपूर्वक जाऊ शकाल.
मानव हा एका बीजासारखा आहे. एकतर तुम्ही जसे आहात तसेच राहू शकता, किंवा स्वतःला फुलं आणि फळांसह एका अद्भुत वृक्षात विकसित करू शकता.
कार्यक्षमता ही नेहमी तुमच्या आसपास असलेल्या लोकांबद्दलच्या प्रेमातून आणि काळजीतून यावी - यंत्रासारखी, बेपर्वा कृती नको.
निर्मात्याच्या निर्मितीकडे लक्ष देणे, हे तुमच्या डोक्यात तयार केलेल्या मूर्खपणापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे.
जेव्हा तुम्ही स्वतःला हवं तसं घडवायला सक्षम असता, तेव्हा तुम्ही स्वतःचं भवितव्य देखील हवं तसं घडवू शकता.
वसंत ऋतूचे सौंदर्य हे आहे की, फळ अजून यायचे आहे, पण फूल म्हणजे एक वचन आणि शक्यता आहे.
तुम्ही जर संपूर्ण विश्वाच्या संदर्भात तुमच्या विचारांकडे पाहिलं, तर त्यांना काहीही अर्थ नाही. जर तुम्हाला हे कळलं, तर तुम्ही स्वाभाविकपणे तुमच्या विचारप्रक्रियेपासून अंतर निर्माण कराल.
तुम्ही उत्साही, आनंदी आणि छान राहिलात, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुम्ही जेव्हा चिंताग्रस्त असता त्यापेक्षा खूप चांगली काम करेल. जीवनाची परिपूर्णता हेच खरं आरोग्य.
आवश्यक ऊर्जेशिवाय जागरूक राहणे अत्यंत कठीण आहे. म्हणूनच साधना किंवा योगिक अभ्यास - ऊर्जा जागृत करण्यासाठी.
बहुतेक लोकांमध्ये भावना ही सर्वात मजबूत शक्ती आहे - अगदी, जे स्वतःला बौद्धिक समजतात, त्यांच्यातही.
प्रेम ही देवाणघेवाण नाही तर तुमच्या आत जळणारी एक ज्योत आहे. जेव्हा ती तुमच्या अस्तित्वाच्या गाभ्याला जाळते, तेव्हा ती मुक्त करते.
प्रामाणिकपणा हा कृतीबद्दल नाही, तर त्याच्या हेतूबद्दल आहे. प्रश्न असा आहे की, तुम्ही जे करत आहात ते व्यापक कल्याणासाठी की स्वतःच्या फायद्यासाठी.